आपण
चांगले कपडे
घालतो कारण
आपण रसिक असतो
व आपली
'टेस्ट'ही
चांगली असते;
ते चांगले
कपडे घालतात,
तेव्हा मात्र
त्यात 'चीप'
डामडौल असतो!
आपण
चारजणांना
जेवायला
बोलावतो ते
आपल्याला
माणसे आवडतात
म्हणून. ते
'पाटर््या
फेकतात'
स्वार्थ
साधण्यासाठी,
केवळ
'कॉन्टॅक्ट्स'
वाढवण्यासाठी!
आपण
सामाजिक
कार्यात भाग
घेतो ते
बांधिलकीपोटी,
समाजाचे आपण
काही देणे
लागतो म्हणून.
ते समाजकार्य
करतात तेव्हा
मात्र ते
दिखाऊ,
लब्धप्रतिष्ठित
आणि
मोठेपणासाठी
हपापलेले
असतात!
एखाद्या
कामासाठी
आपल्याला वेळ
लागतो, कारण
आपण प्रत्येक
गोष्टीचा
सारासार
विचार करून
मगच पाऊल
उचलतो.
त्यांनी
कामासाठी वेळ
घेतला तर तो
मात्र
वेळकाढूपणा
असतो! आपला
अभिमान
म्हणजे
अस्मिता असते.
त्यांचा
अभिमान
म्हणजे मात्र
घमेंड
असते!
आपण
एखाद्या
कामासाठी
पैसे घेतो
किंवा देतो
तेव्हा तो एक
'व्यवहार' आहे
म्हणून आपण
त्याचे
समर्थन करतो.
पण तीच गोष्ट
दुसऱ्याने
केली की मात्र
त्याला आपण
भ्रष्टाचारी
ठरवतो. आपण
दुसऱ्याचे
दोष दाखवतो,
कारण आपला
स्वभावच
मनमोकळा असतो.
आत एक, बाहेर
एक असे काही
आपल्याकडे
नसतेच.
त्यांनी टीका
केली की मात्र
आपण त्यांना
फाटक्या
तोंडाचे
ठरवतो! शिवाय
मत्सरी आणि
जळकुडे! आपण
रविवारी घरात
राहतो, कारण
आपल्याला
निवांतपणा
आवडतो. ते घरी
असतात ते
घरकोंबडे
म्हणून! आपले
वाचन हा
व्यासंग असतो.
ते वाचन करतात
कारण ते केवळ
पुस्तकातले
किडे
असतात!
आपण
प्रत्येक
गोष्ट
जागच्या जागी
ठेवत नाही,
कारण
आपल्याला
घराचे हॉटेल
बनवायचे नसते;
घराचे घरपण
कायम ठेवायचे
असते. ते असे
करतात, तेव्हा
तो गचाळपणा
असतो! आपण
प्रत्येक
गोष्ट
जागच्या जागी
ठेवणारे असतो,
तेव्हा ती
आपली
सौंदर्यदृष्टी
असते,
टापटिपीची
उपजतच असलेली
आवड असते. ते
मात्र असे
करतात; कारण
त्यांचे
वागणे-राहणे
कमालीचे
कृत्रिम आणि
मेकॅनिकल
असते!
आपल्याला
नाही बुवा असे
'ते चौकोनी
कुटुंब' बनणे
आवडत!
खूप
वर्षांपूवीर्
अनंत
काणेकरांचा
एक लघुनिबंध
वाचला होता. एक
भली मोठी,
पुरुषभर
उंचीची ढाल
असते. तिची एक
बाजू चांदीची,
तर दुसरी
सोन्याची
असते.
प्रत्येक
बाजूला एकेक
माणूस उभा
असतो. दोघे
कडाकडा भांडत
असतात.
सोन्याच्या
बाजूला उभा
असलेला माणूस
ठासून सांगत
असतो की, 'ही
ढाल सोन्याची
आहे.'
चांदीच्या
बाजूला उभा
असलेला माणूस
आणखीन
तारस्वरात
'ढाल चांदीचीच
आहे,' असे ओरडत
असतो. बराच वेळ
हा प्रकार
चाललेला असतो.
शेवटी शेजारी
उभा असलेला एक
सद्गृहस्थ
त्यांना 'एकदा
आपापल्या
जागा बदलून
बघा आणि मग काय
ते भांडा,' असे
सुचवतो.
दोघांनी तसे
करताच
त्यांना आपली
चूक कळून येते.
दुसऱ्याच्या
डोळ्यांनी
पाहायची सवय
किती मोलाची
आहे, हे
लेखकाला
सांगायचे
होते.
पण
हे सगळे
'ग्यान'
आपल्याला
नसते असे
थोडेच आहे!
आपल्याला ती
दुसऱ्याच्या
डोळ्यांनी
पाहायची सवय
असतेच मुळी. पण
इतरांमध्ये
तेवढी समज आणि
मॅच्युरिटी
नसते त्याला
आपण तरी काय
करणार!
-
भानू
काळे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट